Raksha Bandhan 2023 : भावाच्याही आधी या देवतांना बांधा राखी, भावाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही!

राखी पौर्णिमा कधीपासून कधीपर्यंत आहे?
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 esakal

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे म्हणतात की रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी 30 आणि 31 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याच वेळी, भाऊ त्यांच्या बहिणींना संरक्षण देण्याचे वचन देताना त्यांना काही भेटवस्तू देखील देतात. पण शास्त्रानुसार त्या दिवशी भावाच्या हातात राखी न बांधता काही देवांच्या हातात बांधली तर ते फायदेशीर असणार आहे.

राखी पौर्णिमेशी भावाच्या मनगटावर पहिली राखी बांधण्याऐवजी देवतांना बांधल्यास शुभ फळ मिळते. पण, कोणत्या देवांच्या हाताता राखी बांधावी याबद्दलही शास्त्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Raksha Bandhan 2023
Rakshabandhan 2023 : 7 फूट उंचीची डिजिटल राखी वेधतेय लक्ष! रक्षाबंधनाचे महत्व जपण्यासाठी येवल्यात धडपड मंचचा उपक्रम

ज्योतिषशास्त्रात काही देवतांना पहिली राखी बांधणे शुभ मानले जाते

गणपती बाप्पा

गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते. गणपतीला पहिली राखी बांधावी असे म्हणतात. असे केल्याने तुमच्यावर गणपतीची कृपा राहते आणि जीवनातील समस्या तुम्हाला घेरणार नाहीत.

भगवान शंकर

रक्षाबंधनाचा सण श्रावणाच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. अशा वेळी भगवान शंकराला राखी बांधल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.  

Raksha Bandhan 2023
Rakshabandhan 2023 : प्यार के दो तार से संसार बाँधा है..! रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात उत्साह

मारूती

हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान शिवाचे अकरावे रुद्रावतार हनुमान जी कलियुगात पृथ्वीवर विराजमान आहेत. बजरंगबलीचे स्मरण खऱ्या मनाने केले तर भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात असे म्हणतात. हनुमानजींना राखी बांधल्यास कुंडलीतील मंगळाचा प्रभाव कमी होतो. हनुमानजींनी संजिवनी पर्वत आणून लक्ष्मणजींचे प्राण वाचवले होते. (shree Hanumanji)

श्रीकृष्ण

भगवान श्रीकृष्णाला पहिली राखी बांधून भगवान श्रीकृष्ण भक्तांवर कोणतेही संकट येऊ देत नाहीत आणि प्रत्येक संकटातून भक्तांचे रक्षण करतात.श्रीकृष्णांनी वेळोवेळी द्रोपदीचे आणि पांडवांचे रक्षण केले आहे.

पौर्णिमा कधीपासून कधीपर्यंत

पौर्णिमा तिथीची सुरुवात : ३० ऑगस्ट २०२३ सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी

पौर्णिमा समाप्ती : ३१ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.०५ वाजता (Rakhi Muhurta)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com