Raksha Bandhan 2023 : राखी पौर्णिमेवर संक्रांत आणणारा भद्राकाळ आहे तरी काय? लोक त्याला एवढे का घाबरतात?

रक्षाबंधन कधी साजरं करावं?
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023esakal

Raksha Bandhan 2023 :  यंदाची राखी पौर्णिमा साजरी करावी की नाही, ती कधी करावी या विचारात सगळ्या भगिनी पडल्या आहेत. बहिणी ज्या सणाची वाट पाहतात त्याच सणावर नेकमी संक्रात आली आहे. कारण यंदा पौर्णिमा ३० आणि ३१ ऑगस्ट या दोन दिवशी आहे. ३० तारखेला सकाळी १० नंतर भद्राकाळ सुरू होतो आणि रात्र ९ नंतर तो संपतो.

पौर्णिमेदिवशी भद्राकाळ असल्याने त्याकाळात भावाला राखी बांधू नये असे सांगितले जाते. याआधीही भद्राकाळ येत होता आणि तो आल्यावर लोक कोणतंही शुभ काम केलं जात नाही. त्यामुळे भद्राकाळ नक्की काय आहे, लोक त्याला इतके का घाबरतात याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

पुराणात सांगितले जाते की, भद्रा ही सुर्यदेवांची मुलगी आणि शनिदेवांची बहिण आहे. भद्राचा शब्दश: अर्थ होतो की, ‘जगाचे कल्याण करणारी’. मग असे नाव असताना तिला घाबरण्याचे काय कारण असावे.( what is the bhadrakal)

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan Fashion: रक्षाबंधनासाठी ट्राय करा बॉलिवूड अभिनेत्रींचे हे साडी लुक, सर्वांची नजर तुमच्यावरच खिळेल

शनिदेवांप्रमाणेच या भद्रेचाही स्वभाव तापट असतो. ज्योतिष विज्ञानाच्या मान्यतेनुसार भद्रा वेगवेगळ्या राशींनुसार तीन लोकांत भ्रमण करत असते. जेव्हा ती मृत्यूलोकात असते तेव्हा ती सर्वच शुभकार्यांसाठी अशुभ मानली जाते. त्या काळात केल्या जाणाऱ्या शुभकार्यांचा सर्वनाश करते, अशी मान्यता आहे.

भद्राकाळात का केले जात नाही शुभ काम

जेव्हा भद्रा पृथ्वीलोकात असते तेव्हाही शुभ कामे केली जात नाहीत. भद्रेचा तापट स्वभाव नियंत्रणात रहावा म्हणूनच ब्रह्मदेवांनी तिला कालगणना आणि पंचांगचा प्रमुख भाग असलेल्या व्यष्टी करणमध्ये स्थान दिले आहे. भद्रेपासून लागलेले दोष दूर करण्यासाठी भद्रेचं व्रतही केलं जातं.

हा काळ सुरू असताना शुभ काम, देवदर्शन, यात्रा अशा गोष्टींवरही भद्रेची छाया पडते आणि ते काम पूर्णत्वास जात नाही. (Rakhi Pornima)

या काळात तंत्र विद्या, अघोरी कृत्ये, काही न्यायालयीन आणि राजकीय निवडणूका होत असतील. तर, त्यांच्यावर भद्रेची कृपादृष्टी होते असेही सांगितले गेले आहे.

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : राखी पौर्णिमेदिवशी भावाला ओवाळताना ताटात ठेवा या वस्तू, भावासाठी ठरेल लाभदायी!

मग रक्षाबंधन कधी साजरं करावं?

पंचांगनुसार, या वर्षी रक्षाबंधनाला पंचक आणि भद्रा काल एकत्र आहेत. अशा परिस्थितीत रक्षाबंधन ३० ऑगस्टला साजरे करायचे की ३१ ऑगस्टला, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.५८ वाजता सुरू होईल.

ती ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ०७.०५ वाजता समाप्त होईल. या दिवशी भद्राकाल देखील तयार होत आहे, जो दुपारी ०१.०० पर्यंत असेल. त्यामुळे या भद्रा काळात रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com