Relationship Tips : अनेकदा असं ऐकायला मिळतं की, लग्नानंतर काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये मतभेद सुरू होतात. लग्नाचं पहिलं वर्ष खूप छान असलं तरी त्यात आव्हानंही जास्त असतात. काही लोक याला सहज सामोरं जातात पण काहींना त्यात तडजोड करता येत नाही. याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जिवनावर आणि नातेसंबंधावर होऊ लागतो.
तज्ज्ञांच्या मते, लग्नाचं पहिलं वर्ष आयुष्य बदलून टाकणारं असतं. नवीन नियम, तडजोडीमध्ये बरेच बदल करावे लागतात. या गोष्टींशी तुम्ही स्वतःला किती लवकर जुळवून घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे. अनेक संशोधनांमध्ये असंही समोर आलं आहे की, लग्नाची दोन वर्षे छान पार पडली तर घटस्फोटाची शक्यता नगण्य असते. चला जाणून घेऊया लग्नानंतर नात्याला कसे सामोरं जायचं.
लग्नाच्या पहिल्या वर्षात करा हे काम
- लग्नाआधी हे ठरवून घ्या की एका वर्षासाठी पैशांबाबत कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नाही. तुमच्या खर्चाची यादी तयार करा आणि त्यांचा योग्य वापर करा.
- घरातील कामांमुळे तणाव निर्माण होऊ देऊ नका.
- लग्नाच्या पहिल्या वर्षी जोडीदाराला जास्तीत जास्त वेळ द्या. तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे हे आधीच ठरवा.
- लग्नानंतर शारीरिक संबंधही खूप महत्त्वाचे असतात. जोडीदाराच्या भावना समजून घेण्यासाठी एकमेकांच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढा त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल.
- लग्नानंतर सासरच्या लोकांशी नवीन नाती तयार होतात. अशावेळी, जेव्हा जेव्हा सासरच्या बाजूचा प्रश्न येतो तेव्हा आपल्या जोडादाराशी बोला. कोणत्याही परिस्थितीला शांत मनाने आणि हसतमुखाने सामोरं जा.
- एखाद्या गोष्टाबद्दल जोडीदारासोबत मतभेद असल्यास ते वाढवण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा. मतभेद टाळा आणि शक्य तितक्या लवकर तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
- तुमच्या जोडीदाराचे मन जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून काय हवे आहे हे जाणून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.