ब्रेक अप झालं की आयुष्य थांबल्या सारखं वाटू लागतं; पण यश-अपयश हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, जर कधी नात्याबद्दल निराशा वाटली तर घाबरण्याऐवजी पुढे जायचा विचार करावा.प्रेम ही प्रत्येकासाठीच खूप हळवी भावना असते, जेव्हा आपण आपल्या लव्ह पार्टनरसोबत असतो तेव्हा आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं, पण जर काही कारणास्तव नातं तुटलं तर आयुष्यातलं सगळंच विस्कटल्यासारखं वाटतं.
ब्रेकअपला अपयश समजू नका
आपण प्रेमात काही उगाच पडत नाही; एखादा माणूस आपल्या मनाच्या खूप जवळ येतो, आपल्या सहवासात सतत असतो, आपणही त्याला मनातलं सगळ सांगतो, पण अचानक जेव्हा छोट्याश्या कारणाने ते नातं तुटतं, तर आपला हिरमुसड होतो आणि आपल्याला हे खूप मोठं अपयश वाटू शकतं.
सर्वात आधी, तुम्ही ब्रेकअप झाला आहे हे स्वीकारा आणि दोघांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत हे देखील स्वीकारा. तुमच्या मनात कोणते गिल्ट असेल तर ते काढून टाका आणि या गोष्टी लक्षात ठेवा.
स्वतःला कधीही कमी लेखू नका
ब्रेकअपचे कारण काहीही असो, परंतु स्वतःला दोष देण थांबवा कारण याने तुम्हाला अस वाटेल की तुम्ही कुठेतरी कमी आहात आणि नातेसंबंध हाताळू शकत नाही. आपल्या नात्यातील कटू आठवणी विसरून पुढे जाण्यातच शहाणपणा आहे, तरच तुम्ही आत्मविश्वासाने आयुष्य जगू शकाल.
काही दिवस बाहेर फिरायला जा
जर तुम्ही एका जागीच राहिलात तर तुम्ही त्याच व्यक्तीचा विचार करत राहाल आणि स्वतःला त्रास करून घ्याल त्यापेक्षा जरा काही दिवस दुसरीकडे फिरायला गेलात तर वातावरण बदलणं तर होईलच पण तुम्हालाही जरा बरं वाटेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.