

Blood Donation
sakal
उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने अनेक जण रक्तदान करीत नाहीत. महाविद्यालयांना सुट्या असतात. अनेक जण बाहेरगावी जातात. त्यामुळे शिबिरांची संख्या कमी होते. त्यातच उन्हाळी सुट्यांमुळे नियोजित शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण जास्त असते. परिणामी दर वर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होते. यामुळे सुदृढ व्यक्तीने शासकीय रुग्णालयात जाऊन रक्तदान करावे, असे तज्ज्ञांचे आवाहन आहे. कोणताही सुदृढ व्यक्ती वर्षातून तीन महिन्याच्या अंतराने ४ वेळा रक्तदान करू शकतात. रक्तदान केल्याने रक्तदाबाची समस्या निर्माण होत नाही.