Vastu Tips : पितळेचे भांडे घरातील बंद खोलीत असणे अशुभ, येईल आर्थिक संकट

एका प्रसिद्ध वास्तूशास्त्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा काही वस्तू ठेवल्याने घरात दारिद्र्य येते.
Vastu Tips
Vastu Tips
Summary

एका प्रसिद्ध वास्तूशास्त्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा काही वस्तू ठेवल्याने घरात दारिद्र्य येते.

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी असावी असे वाटते. त्यासाठी प्रत्येकजण शक्य ते सर्व प्रयत्न करत असतात. यासाठी कुटुंबात सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते. वास्तुशास्त्रात अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो असतो असे वास्तूशास्त्र सांगते.

दरम्यान, त्याचमुळे वास्तूनुसार, वस्तू ठेवण्याचा सल्ला दिला जातो. काही लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्यामुळे त्यांना कौटुंबिक वाद, आर्थिक संकट यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. एका प्रसिद्ध वास्तूशास्त्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा काही वस्तू ठेवल्याने घरात दारिद्र्य येते. आज आपण अशाच काही वस्तू जाणून घेणार आहोत. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात ठेवू नये...

Vastu Tips
Home Tips: उंदरांमुळे त्रासले आहात 'हे' उपाय नक्की करून बघा

घड्याळ बंद ठेवू नका

जीवनात वेळेला खूप महत्व आहे. वेळ हा एक मौल्यवान घटक आहे. योग्य वेळ आली की जीवनात आनंदाचे वातावरण येते असे म्हटंले जाते. सर्व घरांमध्ये भिंतींवर घड्याळे बसवलेली असतात. परंतु अनेक वेळा ती एकतर बंद पडून असतात किंवा खराब झालेली असतात. लोक ते काढून घेतात आणि घरी कुठेतरी तसेच ठेवून देतात. जे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. घरात बंद घड्याळ ठेवल्याने व्यक्तीवर वाईट वेळ येऊ शकते, त्यामुळे खराब किंवा बंद घड्याळ घरात ठेवू नये.

गंजलेल्या गोष्टी ठेवू नका

वास्तूशास्त्रानुसार गंजलेल्या वस्तू घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. वास्तूनुसार अशा वस्तू घरात ठेवल्याने गरिबी आणि दुःख येते, त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवणं टाळावं. तुम्ही अशा नको असलेल्या वस्तू कचऱ्यातून किंवा स्क्रॅपमधून बाहेर टाकू शकता.

Vastu Tips
Vastu Tips : इतरांच्या 'या' 5 वैयक्तिक गोष्टी चुकूनही वापरू नका, अडचणीत येऊ शकाल..

पितळेचे भांडे

पितळेची भांडी घरात ठेवणे शुभ मानले जात असले तरी पितळेची भांडी बंद किंवा अंधारात ठेवल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात. पितळेची भांडी अंधारात ठेवल्याने शनिदोषाची सुरुवात होते. त्यामुळे आर्थिक संकट येवून घरी नकारात्मक ऊर्जा राहू शकते. त्यामुळे पितळेची भांडी बंद खोलीत ठेवू नयेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com