World Post Day 2025
Sakal
लाइफस्टाइल
World Post Day 2025: सर... अभ्यास कसा पूर्ण होणार? विद्यार्थिनीने पत्रातून प्राचार्यांकडे व्यक्त केल्या भावना
अकरावीच्या एका विद्यार्थिनीने प्राचार्यांनाच पत्र लिहून भावना व्यक्त केल्या. निमित्त होते, देवगिरी महाविद्यालयात टपाल दिनानिमित्त घेतलेल्या ‘पत्रलेखन उपक्रमा’चे
Summary
देवगिरी महाविद्यालयात टपाल दिनानिमित्त आयोजित पत्रलेखन उपक्रमात अकरावीच्या विद्यार्थिनीने प्राचार्यांना लिहिलेल्या पत्राने शिक्षणव्यवस्थेतील अपूर्ण अभ्यासक्रमाची वेदना उघड केली. विद्यार्थिनीने अभ्यासक्रमाच्या अपूर्णतेबद्दल चिंता व्यक्त केली, ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘दहावीला पास होऊन तीन महिने झाले, आता अकरावीला प्रवेश घेतल्यामुळे अभ्यासक्रम कळत नाही. काही विषय शिकवण्याचे पुढे गेलेत; काही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. दिवाळीनंतर परीक्षा होणार म्हणतात, पण अभ्यास कसा पूर्ण होणार?’ अजून आयकार्ड मिळालेलं नाही, पुस्तकं आणि नियमित वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत...’’

