महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली: दिग्विजय सिंह

digvijay singh
digvijay singh

नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली आहे आणि देशात महात्मा गांधींची विचारधारा हरली ही सर्वात चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणूकीच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.

देशातील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या भोपाळमधून दिग्विजय सिंह यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभवानंतर दिग्विजय सिंह यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, 'महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली आहे आणि देशात महात्मा गांधींची विचारधारा हरली ही सर्वात चिंतेची बाब आहे. भोपाळच्या विकासासाठी जनतेला जी आश्वासने मी दिली ती पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करेन. पराभवानंतरही भोपाळच्या नागरिकांसोबत राहीन.'

भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर मोठय़ा मताधिक्याने विजय मिळवला. मध्य प्रदेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सत्ता हिसकावून घेणाऱ्या काँग्रेसची लोकसभेच्या निवडणुकीत दयनीय अवस्था झाली. राज्यातील 29 पैकी 28 जागांवर भाजपने विजय मिळवला असून, फक्त एका जागा काँग्रेसला मिळाली आहे. छिंदवाडा मतदारसंघातून मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल यांनी काँग्रेससाठी एकमेव विजय मिळवून दिला आहे.

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा 3 लाख 64 हजार 822 मतांनी पराभव केला. दिग्विजय सिंह यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. संपूर्ण देशाचे लक्ष या मतदार संघावर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com