Loksabha 2019 : गेहलोत यांचे राष्ट्रपती कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान

 Loksabha 2019 : गेहलोत यांचे राष्ट्रपती कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. जातीय समीकरण जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनविण्यात आले होते. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रपती पदावर विराजमान होता आले नाही, अशी टीका अशोक गेहलोत यांनी भाजप सरकारवर केली आहे.

अशोक गेहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात अशोक गहलोत यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुजरातच्या निवडणुका येत होत्या. गुजरातमध्ये आपले सरकार बनत नाही, त्यामुळे भाजप घाबरले होते. मला असे वाटते की, रामनाथ कोविंद यांना जातीय समीकरण जुळवण्यासाठी राष्ट्रपती बनविले आणि लालकृष्ण आडवाणी यापासून सुटले. असे अशोक गहलोत यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com