कुर्डुवाडी : "अच्छे दिन' येण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने जनतेची घोर फसवणूक केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे वादळ आले आहे. या वादळात भाजपच्या कमळाच्या पाकळ्या उडून जातील, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल केला.
येथील आझाद मैदानावर आयोजित माढा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. मुंडे म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यामध्ये भाजपने समाजाची फक्त फसवणूकच केली आहे. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करू, असे भाजप सरकारने आश्वासन दिले होते. परंतु याबाबतही तरुणाईची फसवणूक केली आहे. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होईल, असे भाजपवाले म्हणाले. परंतु 15 पैसेदेखील मिळाले नाहीत. प्रत्येक गावागावात सर्वसामान्यांतून "अच्छे दिन'ची चेष्टा होऊ लागली आहे.
पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर कौटुंबिक टीका करायला नको होती. यातून मोदींची पराभवाची मानसिकता दिसत आहे, असे मुंडे म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.