‘मध्य प्रदेशच्या व्यापमंसारखा महाराष्ट्रात महा-ई-पोर्टल घोटाळा’

‘मध्य प्रदेशच्या व्यापमंसारखा महाराष्ट्रात महा-ई-पोर्टल घोटाळा’

औरंगाबाद : महा-ई-पोर्टल गैरव्यवहारात भाजपचे कार्यकर्ते अडकले आहेत. त्यामुळे सरकार त्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील "महाव्यापमं' गैरव्यवहारसारखाच महाराष्ट्रात महा-ई-पोर्टल गैरव्यवहार आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

सरकार पाठिशी घातलंय
राजू शेट्टी यांनी काल औरंगाबादमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता. त्यात त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेट्टी म्हणाले, ‘महा-ई-पोर्टल सेवा ही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. मध्य प्रदेशातील "महाव्यापमं' गैरव्यवहारसारखाच महाराष्ट्रात महा-ई-पोर्टल गैरव्यवहार आहे. यात भाजपचे कार्यकर्ते अडकल्याने सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. सरकारने राज्यात तत्काळ नोकरभरती करावी आणि एमपीएससी किंवा अन्य यंत्रणांच्या माध्यमातून ती केली जावी.’

मेगाभरती भाजपमध्ये
शेट्टी म्हणाले, ‘राज्यातील फडणवीस सरकारने बेरोजगारांसाठी मेगाभरती करू, असे आश्‍वासन दिले होते. सध्या मेगाभरती सुरू आहे; पण ती भाजपमध्ये इतर पक्षांतील राजकीय नेत्यांची, तरुणांच्या हाताला मात्र काम नाही.’ महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री शेतकरीहिताचे काही निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरली. आज मका पिकावर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. खासगी कंपन्या यातून मालामाल झाल्या, शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळाले नाही. पीकविमा योजनेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी या वेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com