मुंबई : राज्यात रविवारी कोरोनाच्या 440 नव्या रुग्णांची नोंद झाली; त्यामुळे बाधितांची संख्या 8068 वर गेली. आणखी 112 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत एकूण 1188 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. राज्यात 11 पुरुष व 8 महिला अशा आणखी 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबईतील 12, पुण्यातील तीन, जळगावमधील दोन आणि सोलापूर व लातूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
महत्वाची बातमी ः रुग्णांचे निदान वाढवण्यासाठी गेम चेंजिंग ठरणार पल्स ऑक्सीमीटर
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 19 रुग्णांपैकी सात जण 60 वर्षे किंवा त्यावरील, 10 जण 40 ते 59 वयोगटातील आणि दोन जण 40 वर्षांखालील होते. 11 रुग्णांना (73 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग असे अतिजोखमीचे आजार होते. चार रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती मिळालेली नाही. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 342 वर गेली आहे. आतापर्यंत राज्यातील 1188 बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1,36,926 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि 9160 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
थोडक्यात आकडेवारी
तपासलेले नमुने : 1,16,345
निगेटिव्ह : 1,07,519
पॉझिटिव्ह : 8,068
क्लस्टर कंटेनमेंट झोन : 604
सर्वेक्षण पथके : 8,603
पाहणी झालेले नागरिक : 33.72 लाख
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.