
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच मध्य रेल्वेने ही त्यांची वाहतूक तो पर्यंत बंद राहणार आहे, असे स्पष्ट केले आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रेल्वेची एक्स्प्रेस, मेल, लोकल आदी वाहतूक 15 एप्रिलपासून सुरू होईल, अशी शक्यता गृहीत धरून रेल्वेने त्या नंतरच्या प्रवासासाठी आरक्षण सुरू केले होते. परंतु आता आरक्षणाचा प्रवाशांना पूर्ण परतावा देण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासााठी येथे ► क्लिक करा
ऑनलाइन पद्धतीने रिफंड आठ दिवसात मिळणार असून तिकीट खिडकीवर जर रिफंड पाहिजे असल्यास तो 31 जुलैपर्यंत मिळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुणे विभागातून रोज सुमारे 212 गाड्यांची वाहतूक रेल्वेची होते सुमारे पाच लाख प्रवासी त्यातुन वाहतूक करतात. मुंबईत 1500 लोकलमधून दररोज 30 लाख प्रवासी प्रवास करतात. लॉक डाऊनच्या काळात रेल्वेची माल वाहतूक सुरु राहणार असल्याचे झंवर यांनी स्पष्ट केले आहे.
आरेच्या दुधाच्या टेम्पोत बियरच्या बाटल्या; पोलिसांनी अशी पकडली तस्करी!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.