तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळत नसतील तर ५ तारखेपर्यंत होणाऱ्या मोहीमेत सहभागी व्हा

5 August Deadline for participation in PM Kisan Samman Yojana till
5 August Deadline for participation in PM Kisan Samman Yojana till

अहमदनगर : जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप या योजनेचा ज्यांनी लाभ घेतला नाही, त्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबविणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना राबवली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. बँकेच्या खात्यात तीन हप्त्यात ही रक्कम जमा होते. याचा लाभ ज्यांनी घेतला नाही. त्यांच्यासाठी राज्य सरकार 5 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविणार आहे.

यामध्ये ज्या लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. यासंदर्भाती त्यांनी ट्विट केले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 91 लाख 13 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात 6 हजार 949 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी सहसंचालक यावेळी उपस्थित होते.
राज्यात 1 कोटी 52 लाख शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 4 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com