नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी त्यांना मतदान केलं होतं.
सध्या राज्यात राजकीय वातावरणात अनेक बदल पहायला मिळत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखाली राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा आकडा आता ५० वर पोहोचला आहे. संबंधित आमदारांनी बंडखोरी करण्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. आता आमदार अब्दुल सत्तार यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. (maharashtra political news)
सत्तार यांनी राऊतांना खोचक सवाल केला आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांनी त्यांना मतदान करावं, म्हणून आम्हाला किती कोटी दिले? हे आई बापाची शपथ घेऊन सांगावं. खरंतर, संजय राऊत हे राज्यसभा खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी त्यांना मतदान केलं होतं. याच पार्श्वभूमीवर सत्तार यांनी संजय राऊत यांना हा सवाल विचारला आहे.
पुढे ते म्हणाले की, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं पद हे कार्यकर्ता आहे. मला फक्त कार्य करायचं आहे. राजकारणात पदं येतात आणि जातात. पण मला माझ्या मतदारसंघासाठी काम करायचं आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर चार दिवसांत मला जेवढा निधी मिळाला; तेवढा निधी मी माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीही पाहिला नाही, असंही सत्तार यांनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. शिंदे गटाच्या वाट्याला किती राज्यमंत्री पदं आणि कॅबिनेट मंत्रीपदे येतात, हे पहावे लागेल. त्यानुसार वाटाघाटी आणि पुढील रुपरेषा ठरवली जाऊ शकते. तुम्हाला कोणतं पद अपेक्षित आहे, असं विचारलं असता ते म्हणाले की, आपल्याला कोणतंच पद नको, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असावेत, एवढीच अपेक्षा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.