मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे का? 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
आरक्षणामुळे बहुजन समाज भयभीत झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी जो निर्णय घेईल. त्याबरोबर आपण रहावे असे आवाहन, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.
कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे का? यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका नाही. ते यावर मत व्यक्त करत नाहीत. यावरून ते मराठा समाजाचे पक्ष असल्याचे दिसत आहे, असा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केला. आज त्यांच्या हस्ते आरक्षण बचाव यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, ‘ओबीसी समाजाला (OBC Community) आपले आरक्षण टिकणार का याची भीती आहे. मात्र, त्यांना याबद्दलचा विश्वास दिला जात नाही. सभागृहातून ओबीसी आरक्षण रद्द होईल असे त्यांना वाटते. त्यामुळे शंभर ओबीसी आमदार निवडून आणा, असे आम्ही म्हणतो आहोत. सरकारने रेकॉर्डमध्ये खाडाखोड करून ५५ लाख प्रमाणपत्रे दिली आहेत. कुणबी समाजाला आरक्षण आहेच. पण, ही प्रमाणपत्रे घेऊन आरक्षण देणे योग्य नाही. शासनाने ते रद्द केले पाहिजे.
न्यायालयात जात म्हणजे कुटुंब असे मानले जाते. त्यामध्ये सगेसोयरे येत नाहीत. सगेसोयरे यांना आरक्षण आम्हाला मान्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावर भूमिका घेत नाहीत. ओसीबी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे का देऊ नये यावर त्यांची कोणतीही भूमिका नाही. यावरून ते मराठा समाजाचे पक्ष असल्याचे आता दिसत आहेत.
आरक्षण यात्रा २२ जिल्ह्यातून असून ७ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे यात्रेचा समारोप होईल. प्रत्येक पक्षाची राजकीय भूमिका वेगळी असते. पण समाजात सलोखा राहीला पाहीजे. यासाठी आमची यात्रा आहे.’ पत्रकार परिषदेला डॉ.क्रांती सावंत, प्रा.सोमनाथ साळुंखे, रमेश बारस्कर, अविनाश भोसेकर, इम्तियाज नदाफ, पुंडलिक कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
'येणाऱ्या निवडणुकीत वंचितसोबत राहा'
जयसिंगपूर : आरक्षणामुळे बहुजन समाज भयभीत झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी जो निर्णय घेईल. त्याबरोबर आपण रहावे असे आवाहन, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. येथे वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा शुक्रवारी (ता.२५) आली होती. क्रांती चौकात राजर्षी शाहू महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले. ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांना आरक्षणाचे सुख, दु:ख नाही. काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मराठा समाजाला दुखवायचे नाही म्हणून भूमिका घेतली आहे. त्यामुळे मतदान करून आपली भूमिका लोकप्रतिनिधींना दाखवावी लागेल.’
'संभाजीराजेंकडे वैचारिक प्रामाणिकपणा नाही'
संभाजीराजे यांच्यासोबत जाण्याच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘संभाजीराजे यांच्याकडे वैचारिक प्रामाणिकपणा नाही. आम्ही त्यांना बरोबर येण्यासंदर्भात विचारले होते. मात्र, त्यांच्याशी वैचारीक मतभेद असल्याने त्यांच्यासोबत जाणार नाही.
मी म्हणजे पक्ष ही राजू शेट्टींची भूमिका चुकीची
राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘राजू शेट्टी यांची भूमिका मी म्हणजे पक्ष अशी आहे. याबाबत मी त्यांना बोललो होते. पण त्यांनी माझे ऐकले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.