
नाशिक : शेतकरी कर्जमाफीतून लग्न, साखरपुडे करतात, अशा वादग्रस्त विधानानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. मस्करीमध्ये बोललेल्या विधानामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कोकाटे यांनी रविवारी (ता.६) नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात रामनवमीनिमित्त प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेतले.
यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली.