कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज दुसऱ्या दिवशी ते कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी २०२४च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
अमित शहा म्हणाले की, मी इथे २०२४ च्या विजयी अभियानासाठी आलो आहे. २०२४ मध्ये पुन्हा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपसह घटकपक्ष निवडणूक लढवणार आहे. तर पुढे महाविकास आघाडीतील तीन पक्षांसह प्रकाश आंबेडकर आपल्याविरुद्ध लढणार आहे. मात्र पुढची निवडणूक भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठी नाही, पुढची निवडणूक मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी नाही. २०२४ ची निवडणूक महान भारताच्या रचनेसाठी आणि समृद्ध भारत बनविण्याची असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं.
मोदीजींनी ९ वर्षांच्या आत मोठं परिवर्तन केलं. देशाची प्रगती झाली. देशाची सुरक्षा झाली. देशात समृद्धी आणली. त्यामुळे सर्व एकत्र आले आहे. येथे आलेले कार्यकर्ते पाहून आपण कधी पराभूत होऊ हे शक्य नाही. त्यातच मोदींजी यांच्यासारख नेतृत्व असेल तर पराभव दूरपर्यंत दिसत नाही, असंही शहा यांनी नमूद केलं.
दरम्यान अमित शहा यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष सध्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा करत आहे. अद्याप प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील झालेली नाहीत. मात्र अमित शहा यांनी त्यांचा भाषणात उल्लेख केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
शहा म्हणाले २००४ ते २०१४ पर्यंतच्या काळात कोणाही पंतप्रधानांना पंतप्रधान मानत नव्हतं. सगळे स्वत:लाच पंतप्रधान समजायचे. दररोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येत होत्या. सरकार चालवणाऱ्यांना कळत नव्हतं की, कोण आज आपल्या डोक्यात टपली मारेल. दररोज पाकिस्तान भारतात घुसखोरी करत होते. पाकिस्तानविरुद्ध भूमिका घेण्याची कोणाची हिंमत नव्हती, असंही शहा म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.