विनातारण कर्ज योजनेची घोषणा

State-Government
State-Government

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत विनातारण कर्ज योजनेचा मंगळवारी प्रारंभ केला. यामध्ये बेरोजगारांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी १० ते ५० लाखांपर्यंत कर्ज मंजूर केले जाणार आहे. कर्जाची हमी राज्य सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीची पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या कामगिरीशी तुलना केली. ते म्हणाले, ‘‘या पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात रोजगारनिर्मिती, औद्योगिक गुंतवणूक, विदेशी गुंतवणूक याबाबत राज्य मागासलेलेच होते. त्यानंतर २०१४ पासून राज्य या तीनही क्षेत्रांत पहिल्या क्रमांकावर आले. परकीय गुंतवणुकीमध्येही राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत १० लाख २७ हजार लघुद्योग निर्माण केले असून, त्याद्वारे ५९ लाख ४२ हजार रोजगार क्षमता निर्माण केली आहे.’’

निती आयोगाने देशाच्या रोजगारनिर्मिती अहवालात महाराष्ट्राने २५ टक्के रोजगार निर्माण केल्याचा 

उल्लेख केला आहे. त्यामुळेच या वर्षी राज्य सरकारने या विनातारण कर्ज योजनेसाठी ५०० कोटी रुपये मंजूर केले असून, प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी ५० लाख, तर कृषिपूरक उद्योग प्रकल्पांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले जाणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील बेरोजगार युवकांनी नोकरीच्या मागे न लागता, स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. मात्र, यातील विविध योजनांमध्ये कर्ज मंजूर न झाल्यास त्यांना नैराश्‍य येते. अशा घटना टाळण्यासाठी उद्योग विभागाने एक वेगळी समिती स्थापन करून, कर्जासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याबरोबरच कर्ज मिळवून देण्याचे काम करायला पाहिजे.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com