

Maharashtra
esakal
उपसरपंच देवाजी राजू ध्यानबोईवार यांच्या नावाने शेती नाही. तरीही त्यांना सन २०२४-२५ च्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळाला. हा सर्व प्रताप येथील तलाठी सुनील नगराळे यांनी केला. या दोघांवरही फौजदारी कारवाई करून पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी येथील माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य विजय बोम्मावार यांनी पत्रकार परिषदेत केली.