

Aurangzeb: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर उखडून टाकाली, अशी मागणी काही हिंदू संघटना करीत आहेत. केवळ हिंदू संघटनाच नाही तर भाजपचे काही मंत्री, शिवसेनेचे मंत्री करीत आहेत. या प्रकारामुळे राज्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सोमवारी रात्री नागपूमध्ये तर दंगल उसळली. या सगळ्या प्रकारावर एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सविस्तर लेख लिहून भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा लेख शेअर केलाय.