Bacchu kadu : रोज मरण्यापेक्षा एकदाच मरण आलेलं बरं; अजितदादांच्या कार्यक्रमात गोंधळावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bacchu Kadu on Ajit Pawar : पुण्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना धीरानं घेण्याचा सल्ला दिला आहे.
Bacchu Kadu on Ajit Pawar
Bacchu Kadu on Ajit PawarEsakal
Updated on

गेल्या सात दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमात गोंधळ घातला. अजित पवार यांच्या कार्यक्रमावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांनी धीरानं घ्यावं असा सल्ला दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com