भीमा नदी ओव्हरफ्लो! उजनीतून भीमा नदीत ७६ हजार क्युसेक तर वीर धरणातून ४७ हजार क्युसेकचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर सतत पाऊस पडत असून हवामान विभागाने रेड ॲलर्ट दिलेला आहे. भीमा व नीरा खोऱ्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या दौंड येथून उजनी धरणात एक लाख क्युसेक वेगाने पाणी येत आहे.
Pandharpur Rain
पंढरपुरात चंद्रभागेला आला पूरsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणात मंगळवारी (ता. १९) सायंकाळपर्यंत १०५.२५ टक्के जलसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सततचा पाऊस आणि पुणे जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सायंकाळी सात वाजता धरणातून ७५ हजार तर वीजनिर्मितीसाठी एक हजार ६०० विसर्ग सोडण्यात येत असल्याने भीमा नदीत ७६ हजार ६०० क्युसेक विसर्ग मिसळत आहे. पुराच्या शक्यतेने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर सतत पाऊस पडत असून हवामान विभागाने रेड ॲलर्ट दिलेला आहे. भीमा व नीरा खोऱ्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या दौंड येथून उजनी धरणात एक लाख क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे १०५ टक्के भरलेल्या उजनीच्या साठ्यात बुधवारी (ता. २०) आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूरनियंत्रणासाठी रात्री नऊपासून ७५ हजार क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रातील साहित्य, जनावरे तत्काळ हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवसभरात विसर्ग १६०० वरुन ७५ हजार ६०० क्युसेकवर

सकाळी सहा वाजता उजनीतून एक हजार ६०० क्युसेक विसर्ग होता. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने दुपारी १२ वाजता तो पाच हजार, दुपारी दोन वाजता १० हजार, दुपारी चार वाजता १५ हजार तर सायंकाळी पाच वाजता २५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन खबरदारी म्हणून सायंकाळी सात वाजता विसर्ग ४१ हजार ६०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर रात्री आठ वाजता तो ६१ हजार ६०० करण्यात आला.

नदी काठावरील सर्वांना सतर्कतेचा इशारा

पूरनियंत्रणासाठी उजनीतून मोठा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकीनुसार धरणातून विसर्ग कमी - जास्त होण्याची शक्यता आहे.

- एस. एस. मुन्नोळी, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर, ता. माढा

आकडेवारी....

  • उजनीतील जलसाठा : १०५.२५ टक्के

  • उजनीतून भीमा नदीत विसर्ग : ७६,६०० क्युसेक

  • दौंडमधून उजनीत आवक : १२,००० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com