police bharatisakal news
महाराष्ट्र बातम्या
मोठी बातमी! १० हजार पोलिसांची भरती १५ सप्टेंबरपासून; उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र
गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पण, सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा, यामुळे पोलिस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतरच म्हणजे साधारणत: १५ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सोलापूर (तात्या लांडगे) : गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पण, सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा, यामुळे पोलिस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतरच म्हणजे साधारणत: १५ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयातील सूत्रांनी दिली. २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची एकूण १० हजार पदांची भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगितले.

