मोठी बातमी! उजनीतून १५ जानेवारीपासून शेतीसाठी पाणी; आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक होणार नाही; सोलापूरजवळील औज बंधाऱ्याने गाठला तळ, पण...

उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले असून धरणात ११७ टीएमसी पाणी आहे. शेतीसाठी धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून सोडले जाणार आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक होणार नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने उजनीतून शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे.
Ujjani Dam :दमदार पावसानंतर भरले उजनी धरण
Ujjani Damsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले असून धरणात ११७ टीएमसी पाणी आहे. शेतीसाठी धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून सोडले जाणार आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक होणार नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने उजनीतून शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे.

उजनी धरणातील पाण्याचे नियोजन आठमाही आहे. धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी कसे ठेवायचे, याचे नियोजन दरवर्षी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होते. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व स्थानिक आमदारांची या बैठकीला उपस्थिती असते. मात्र, सध्या महापालिकेची निवडणूक सुरू असून पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. आचारसंहितेत कालवा सल्लागार समितीची बैठक घेता येणार नसल्याने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिवांना पत्रव्यवहार करून त्यांच्या परवानगीने आता रब्बी हंगामातील पहिले आवर्तन शेतीसाठी सोडणार आहेत.

दरम्यान, सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात आता १० ते १२ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. मात्र, समांतर जलवाहिनीमुळे औजमध्ये नदीवाटे पाणी सोडण्याची मागणी केली जाणार नसल्याची महापालिकेची भूमिका आहे. भीमा नदीतून औज बंधाऱ्यासाठी पाणी सोडल्यास त्याचे पैसे जलसंपदा विभागाला द्यावे लागतील, हे त्यामागील कारण आहे. उन्हाळ्यात शेती व जनावरांसाठी भीमा नदीत पाणी सोडल्यावर आपोआप औज बंधारा भरतो, ते पाणी सोलापूर शहरासाठी वापरता येईल, असेही महापालिकेचे नियोजन आहे.

४० दिवसांचे असणार आवर्तन

रब्बी हंगामाच्या पहिल्या आवर्तनासाठी ६ टीएमसी पाणी लागणार आहे. उजव्या, डाव्या कालव्यासह दहिगाव, सीना-माढा उपसा सिंचन योजना व बोगद्यातून पाणी सोडले जाणार आहे. पहिले आवर्तन ४० दिवसांचे असणार आहे. त्यानंतर १५ मार्चनंतर दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. सोलापूर शहरासाठी सोलापूर ते उजनी अशी १७० एमएलडी क्षमतेची समांतर जलवाहिनी झाल्याने भीमा नदीतून सोडले जाणारे २० टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तीन आवर्तने मिळणार आहेत.

आचारसंहितेनंतर धरणातील पाण्याचे नियोजन

आचारसंहितेमुळे उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने घेतला जाईल. सध्या शेतकऱ्यांची पाण्यासाठी मागणी येत असून साधारणत: १५ जानेवारी दरम्यान उजनीतून पहिले आवर्तन सोडले जाईल. आचारसंहिता संपल्यानंतर उजनी धरणातील पाण्याचे नियोजन अंतिम केले जाईल.

- एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

उजनीतील सध्याची स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ११७ टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • ५३.५७ टीएमसी

  • पहिल्या आवर्तनासाठी पाणी

  • ६ टीएमसी

  • पहिल्या आवर्तनाचे दिवस

  • ४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com