

Bombay High Court
esakal
मुंबई उच्च न्यायालयाने वैवाहिक वादांच्या नावाखाली होणाऱ्या ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती रणजीतसिंह भोसले यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले की, कल्याणकारी कायद्यांचा वापर पैसे उकळण्यासाठी होऊ देणार नाही. पहिले लग्न लपवून दुसऱ्या पतीकडून पोटगी मागणे हे खंडणी उकळण्यासारखे आहे. असे न्यायालयाने स्पष्ट केले.