‘मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचा आमचा निर्धार आहे. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होऊन झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल होईल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत व्यक्त केला.