

eknath shinde
esakal
Eknath Shinde: राज्याचे दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कसलीही चिंता करण्याची गरज नसून ही योजना सुरुच राहणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.