भरतीसाठी गेलेली 200 मुले आसाममध्ये अडकून; निकृष्ट जेवण आणि अक्षम्य हेळसांड

भरतीसाठी गेलेली 200 मुले आसाममध्ये अडकून; निकृष्ट जेवण आणि अक्षम्य हेळसांड

पुणे : "आसाम रायफल्स'च्या भरतीसाठी महाराष्ट्रातुन आसाममध्ये गेलेले तरुण कोरोनाबाधीत आढळल्याने त्यांना तेथील दिपू वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठेवण्यात आले. सुरुवातीला तीन दिवस जेवण, पाणीही मिळाले नाही, आता निकृष्ट जेवणामुळे, थंड पाण्यामुळे तरुण आजारी पडलेत, काही जण पळून गेल्याने ते सुटले, परंतु अजुनही 200 पेक्षा जास्त तरुण तेथे अडकून पडले आहे. "आम्हाला चांगले जेवण, गरम पाणी आणि परीक्षेला बसू देण्याची व्यवस्था करावी' इतकी माफक अपेक्षा उपाशीपोटी राहीलेल्या उमेदवारांकडून केली जात आहे.

भरतीसाठी गेलेली 200 मुले आसाममध्ये अडकून; निकृष्ट जेवण आणि अक्षम्य हेळसांड
150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार; PM मोदी म्हणतात, 'अशक्यही शक्य...'

आसाम राज्यामधील "आसाम रायफल' या निमलष्करी दलातील हवालदार पदासाठीची भरती प्रक्रिया 7 व 8 जानेवारी दरम्यान होणार होती. त्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध जिल्ह्यांमधून तरुण आसामध्ये दाखल झाले होते. महाराष्ट्रातील 200 ते 250 हून अधिक उमेदवार 3 जानेवारीला आसाम राज्यातील करबी अँगलॉंग या जिल्ह्यातील दिपू या छोट्याशा शहरामध्ये दाखल झाले होते. तेथेच त्यांची भरती प्रक्रिया होणार होती. दरम्यान, भरतीपुर्वीच उमेदवारांची कोरोनाची रॅपीड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 ते 70 जण कोरोना संसर्गाने बाधित झाले. त्यांच्यासह 200 हून अधिक तरुणांना दिपू वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

भरतीसाठी गेलेली 200 मुले आसाममध्ये अडकून; निकृष्ट जेवण आणि अक्षम्य हेळसांड
कालीचरणला जामीन मंजूर; भडकाऊ वक्तव्याप्रकरणी होता अटकेत

रुग्णालयात दाखल केल्यापासून सुरवातीची दोन ते तीन दिवस तरुणांना जेवण, पुरेसे पाणी देण्यात आले नाही. तीन दिवसानंतर तरुणांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. दिपू हे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. तरुणांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे सौम्य आहेत, मात्र बदललेले वातावरण, निकृष्ट जेवण, पुरेसे पाणी नसल्यामुळे तरुणांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊन त्यांची तब्येत बिघडू लागली आहे. याबाबत तरुणांनी स्थानिक प्रशासन, महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष, नेते, सरकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र अजूनही त्यांना मदत मिळाली नसल्याने तरुण अडकून पडलेले आहेत. त्यामध्ये पुणे, नगर, सांगली, नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे असे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे. भितीपोटी 20 ते 25 मुले तेथून पळून गेली आहेत, उर्वरीत तरुण मदतीसाठी आस लावून बसले आहेत. महाराष्ट्रातुन भरतीसाठी गेलेले तरुण 4 ते 5 वर्षांपासून कठिण परिस्थितीवर मात करीत संबंधित पदासाठीची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे त्यांना परिक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने तरुण आणखीनच हवालदिल झाले आहेत.

आमची येथून सुटका करा !

"महाराष्ट्रातुन आम्ही 200-250 तरुण 3 जानेवारीला "आसाम राफल्स'च्या भरती आलो होतो. भरतीपुर्वी आमची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यामध्ये महाराष्ट्रातील आम्ही 60-70 जण कोरोनाबाधीत झालो. त्यामुळे आम्हाला दिपु वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. परंतु, इथे दोन-तीन दिवस आम्हाला जेवण, पुरेसे पाणी दिले नाही. आता निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्यामुळे आमची तब्येत बिघडली आहे. आम्हाला केवळ चांगले जेवण, पाणी आणि परीक्षेला बसण्याची संधी द्यावी. आम्ही गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुले आहोत. 4-5 वर्षांपासून तयारी करीत आहोत. या प्रकारामुळे आमची संधी हिरावुन घेऊ नका. आमची येथून सुटका करा'' किरण आव्हाड (पारवा, परभणी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com