

Central Railway Timetable Change
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेने परिचालन कारणास्तव मुंबई-अमरावती, मुंबई-नागपूर दुरांतोसह राज्यातील महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. येत्या एप्रिल महिन्यापासून टप्प्याटप्प्याने हे बदल लागू होणार असल्याने मध्य रेल्वेने कळविले आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्यांच्या सुटण्याच्या आणि गंतव्यस्थळी पोहोचण्याच्या वेळेतही बदल होणार आहे.