

Central Railway Special Train for ashadhi ekadashi
ESakal
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखों वारकरी पंढरीकडे रवाना होतात. यंदाही भाविकांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने वारकऱ्यांसाठी ५४ आषाढी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. नागपूर, नवी अमरावती, खामगाव, लातूर, भुसावळ, पुणे आणि कोल्हापूर येथून पंढरपूर व मिरजकडे या विशेष गाड्या धावणार असल्याने वारकऱ्यांच्या प्रवासाची मोठी सोय होणार आहे.