
मुंबईः राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषद या संघटनेची बैठक संपन्न झाली आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला असताना भुजबळांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.
बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, बिहार सरकारने ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगनणा केली आहे, तसा सर्व्हे महाराष्ट्रातदेखील व्हायला पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार असल्याचंही भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, जातीनिहाय जनगणना केली तर ओबीसींची संख्या आणि त्यांची परिस्थिती यांचा अंदाज येण्यास मदत होईल. केंद्र सरकारकडून एससी, एसटीला जसे वेगवेगळे फंड मिळतात, तसे फंड ओबीसींनाही मिळू शकतील. त्यामुळे हा सर्व्हे भारत सरकारकडून व्हायला पाहिजे.
ओबीसी आंदोलनाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, मंगेश ससाणे, लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यात आणखी ओबीसींचं आंदोलनं सुरु आहेत. आंदोलकांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाहीये.
लक्ष्मण हाके यांना अतुल सावे, उदय सामंत, संदीपान भूमरे हे नेते भेटलेले आहेत. आमचंही त्यांच्याशी बोलणं सुरु आहे. त्यांनी सरकारकडून लेखी आश्वासन मागितलेलं आहे. यासंदर्भातला तोडगा लवकरच निघेल, असंही भुजबळ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.