कौतुकाची थाप देण्याचा दिलदारपणा विरोधकांमध्ये नाही - उध्दव ठाकरे

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray e sakal

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सर्वांसाठी पाणी' नवे धोरण जाहीर करण्यात आलं आहे. या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री म्हणाले की, तुमचं आयुष्य तुमच्या मताच्या रुपातून आमच्याकडे सोपवत असता, त्यानंतर सरकार नालायक निघत असेल तर तुम्हाला हक्क आहे, त्याचा जाब विचारण्याचा हक्क तुम्हाला आहे. सर्वत्र चित्र दिसतंय की एकतर काम करू द्यायचं नाही, आणि काम केलं असेल तर बोंबलत सुटायचं की भ्रष्टाचार झाला. बाकीचे भ्रष्टाचारी आहेत हा आव आणला जातोय ते भयानक आहे. राजकारण जरूर करा पण त्याला दर्जा असावा असे मुख्यमंत्री म्हणाले.

फक्त विरोध करणं म्हणजे विरोधक नाही, तुमच्याकडून सूचना आल्या पाहिजेत. सरकार चूकत असेल तर कान उपटा पण चांगलं काम करत असेल तर तुमच्याकडे दिलदारी पाहिजे, जी आपल्या विरोधकांकडे नाहीये, जे सरकारणं चांगलं काम केलं आहे असं म्हणतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

१४ तारखेची सभा म्हणजे इकडे-तीकडे वार असं नाही करणार, जे काही मनामध्ये आहे ते मी बोलणार आहे, काही तुंबलेलं नाहीये पण मनामध्ये जे काही आहे. त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. मनमोकळ्या गोष्टी नक्की बोलेन असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com