काय राव, कसा जाईल कोरोना ! मास्कविना फिरतात राज्यात "या' भागातील 54 टक्के लोक
सोलापूर : कोरोनाच्या सुरवातीच्या काळात लोकांमध्ये विषाणूची भीती होती. मात्र, आता प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर लोकांमधील भीती दूर झाली असून, नागरिक बिनधास्तपणे वावरू लागल्याचेही निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. राज्यातील 54 टक्के लोक मास्कचा वापरच करीत नसल्याची बाब सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, त्यात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोक सर्वाधिक आहेत.
राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीनंतर हॉटेल, बिअर बार, दुकाने, विवाह समारंभावर निर्बंध घालण्यात आले. विनामास्क फिरणाऱ्या अथवा आस्थापनांमध्ये बसणाऱ्यांना पाचशे ते एक हजार रुपयांचा दंड केला. तरीही अनेकजण दंडात्मक कारवाई टाळण्यापुरताच मास्क वापरतात. दुसरीकडे, विनामास्क ग्राहक दुकानात आल्यानंतर त्याला वस्तू अथवा माल देऊ नये, अशा सूचना प्रशासनाने देऊनही ग्राहकांना वस्तू विकल्या जातात, असेही निरीक्षण सर्व्हेतून नोंदविण्यात आले आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व हाताची स्वच्छता (सॅनिटायझरचा वापर) या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे वारंवार बजावूनही लोक विशेषत: ग्रामीण भागातील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी "माझे कुटुंब माझी जबाबदारी', "मी जबाबदार' या मोहिमांतून कोरोनाचा प्रादुर्भाव व मृत्यूदर कमी करण्यासाठी भावनिक आवाहन करूनही त्याचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नियम पाळणाऱ्यांपेक्षा मोडणारेच झाले अधिक
राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 46 टक्के लोक मास्कचा नियमित वापर करतात. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांकडून कोरोनासंबंधीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे रुग्ण वाढत असून आरोग्य सुविधेवरील ताण कमी करण्यासाठी नियमांचे पालन बंधनकारक आहे.
- डॉ. तात्याराव लहाने,
संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
12 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ मोठी
कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आरोग्य विभागानंतर फ्रंटलाइनवरील वर्कर्सला टोचण्यात आली. आता 45 ते 60 वर्षांपर्यंतचे को-मॉर्बिड आणि 60 वर्षांवरील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे 60 लाख लोकांना लस टोचली आहे. मात्र, मार्च 2020 च्या तुलनेत मार्च 2021 मध्ये नियमांचे उल्लंघन वाढले असून नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिक, नगर, पुणे, धुळे, जळगाव, सोलापूर, सांगली, जालना, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, औरंगाबाद या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचेही निरीक्षण या सर्व्हेच्या माध्यमातून नोंदविण्यात आले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.