Mumbai News : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातलं राजकारण वेगळ्या दिशेने जात असल्याचं दिसून येत आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना नोटीस बजावली असून ठाकरे गटाच्या आमदारांनाही नोटीस धाडली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयने जे सांगितलं आहे त्यानुसार कारवाई सुरु आहे. शेड्यूल १० नुसार १६ आमदारांना अपात्र व्हावंच लागेल. एकनाथ शिंदेंचा त्यात समावेश असला तरी पर्याय नाही. विधीमंडळ पक्षाची व्याख्या न्यायालयाने केली असून शिंदेंच्या पक्षाचा गटप्रमुख न्यायालयाला मान्य नाही.
दानवे पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाईल की नाही, हे माहिती नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी नेमलेले प्रतोद सुनिल प्रभू हेच कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत. त्यामुळे त्यांचा व्हिप लागू होईल. आमदारांवर कारवाई होणार हे निश्चित आहे.
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनाच मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल, असं राजकीय जाणकार सांगत आहेत. नाहीतरी बंडानंतरच्या पहिल्या बैठकीत अजित पवारांनी किती दिवस उपमुख्यमंत्री रहाचयं, असं विधान करुन मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली होती. आज विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेली नोटीस शिंदे गटावर दबाव निर्माण करण्यासाठी नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.