

बंगालच्या उपसागरातील ‘फेइंगल’ चक्रीवादळामुळे राज्यात काही दिवस थंडी गायब झाली होती. पण गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे . देशात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने महाराष्ट्रात चांगलाच गारठा वाढला आहे. पाकिस्तानकडून जमिनीलगत वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. पुढील आठवडाभर थंडी टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.