मुंबई - ‘काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र गद्दारसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा आहे, तर पाकिस्तान निर्मितीच्या विचाराला पाठबळ देणारा विचार भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे..स्वातंत्र्याची लढाई सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची महंमद अली जिनाच्या मुस्लिम लीगशी युती होती, त्या मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोर्चा काढायचाच तर तो फडणवीसांच्या बंगल्यावर काढावा,’ असा घणाघात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे..भाजप आणि शिवसेनेने आज काँग्रेसविरोधात मोर्चे काढले, त्यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ बोलत होते. ते म्हणाले, ‘भाजपने हा मोर्चा त्यांच्याच सरकारमध्ये असलेल्या एका मंत्र्याच्या घरावर काढायला हवा होता. या मंत्र्याचे भाऊ ‘हू किल्ड करकरे’ पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकात सर्व गोष्टींचा ऊहापोह आहेच; पण संघाचा थेट संबंध कसा आहे, हेही लिहिलेले आहे.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.