मुंबई - ‘राज्यघटनेमुळे देशातील वंचित घटकाला न्याय दिला आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती आहेत. त्यांना हा मान बाबासाहेबांच्या घटनेमुळे मिळाला आहे. बाबासाहेबांच्या घटनेमुळे शेवटच्या घटकाला समानता, हक्क, न्याय मिळत आहे. शांततेच्या काळात किंवा कोणत्याही परिस्थितीत देशाला ही घटना एकसंध बांधून ठेवेल,’ असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.