
मुंबई : देशासहीत महाराष्ट्रात कोरोनाने (corona) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तरी राज्य सरकार (Government of Maharashtra) कोरोना आटोक्यात आणण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करत आहे. यात आता मुंबई (Mumbai) सह राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असून कोरोनाचा सामना करण्याकरीता सरकारी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात (High Court) केला.
या आधी मुंबईतील कोरोनास्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असा दावा मुंबई पालिकेने मागील आठवड्यात केला होता. यावेळी आठवड्यातील रुग्णसंख्या आणि वैद्यकीय सुविधांचा तपशील मुंबई पालिकेने न्यायालयासमोर सादर केला होता. या वर न्यायालयाने राज्य सरकारला राज्यातील कोरोना परीस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी उच्च न्यायालयात राज्यसरकारच्या वतीने सरकारी वकीलांनी राज्यातील कोरोना परीस्थिती १०० टक्के नियंत्रणात असल्याचे सांगितले. सोबत कोरोनाच्या पुढील आव्हांनासाठी सरकारी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा सुध्दा सरकारी वकीलांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.