नागपूर - चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. रूग्ण वाढीमध्ये चीन आणि त्याच्या आसपासच्या देशांमधील परिस्थिती वाईट असून, यामध्ये जपान, तैवान, हाँगकाँग आदींचा समावेश आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने संपूर्ण जगात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याबाबत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं. (Corona Update news in Marathi)
राजेश टोपे म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी त्रिसुत्री आतापासूनच राबविण्याची गरज आहे. जगात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा उद्रेक झाला आहे. आजपर्यंत देशात सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज आहे.
हेही वाचा सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
टोपे पुढं म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात ऑक्सिजन प्लांट उभारले होते, त्याच्या स्थितीचा आढावा घेणे, आयसोलेश वॉर्ड सुरू करणे, औषधांची पूर्तता करणे, आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. तसेच तातडीने स्टेट टाक्स फोर्स गठित करण्याची आवश्यकता आहे. सोबतच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, असही ते म्हणाले.
देशात कोरोनाने रौद्र रूप धारण केलं त्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये टोपे यांच्याकडे आरोग्य खात्याची धुऱा होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.