मुंबई : राज्यात काल 66 रुग्ण दगावले होते, त्यात वाढ होऊन आज 147 रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,30,753 वर पोहोचला आहे. आज सर्वाधिक 55 मृत्यू कोल्हापूर मंडळात नोंदवण्यात आले. तर ठाणे 39, पुणे 9,औरंगाबाद 3,नाशिक 37,अकोला 1,नागपूर 1 व लातूर मंडळ 2 मृत्यू नोंदवले गेले. आज मृत्यूदारात ही वाढ झाली असून मृत्यूचा दर 2.4 वरून 2.09 टक्के इतका झाला आहे. (Corona Update Mortality of Corona patients increases in maharashtra aau85)
राज्यात आज दिवसभरात 6,910 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 62,29,596 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 94,593 पर्यंत खाली ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज दिवसभरात 7,510 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,00,911 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,58,46,165 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,29,596 (13.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,60,354 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,977 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.