Deepak Kesarkar : 'आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तावडीतून शिवसेनेला सोडवलं म्हणून, लोक आमचं कौतुक करतात'

'आम्हाला भाजपमध्ये जायचे असते, तर आमच्यावर कोणी केसही करू शकले नसते.'
Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal
Summary

छत्रपतींच्या वारसांकडूनच स्टॅंपपेपर लिहून मागायला लागलो, तर मग छत्रपतींचे नाव घेण्याचा हक्क कोणाला शिल्लक राहतो.

सातारा : एकीकडं छत्रपतींच्या नावाचा वापर करायचा अन्‌ दुसरीकडं त्यांच्या वारसांना मान द्यायचा नाही, असं नवं पीक राजकारणात आलं आहे. राजघराण्याचा मान ठेवणं गरजेचं आहे, असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी व्यक्त केलं.

मंत्री केसरकर यांनी जलमंदिर पॅलेस इथं पत्रकारांशी संवाद साधला. आदरपूर्वक भाषा व आतिथ्य हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असून, छोट्या मुलालाही आपल्याकडं आहो म्हटलं जातं, ही आपली संस्कृती असताना अलीकडं वाचाळ संस्कृती येऊ घातली आहे. यातून महाराष्ट्राचे हित कधीही होणार नाही, असा टोला शिक्षणमंत्री केसरकरांनी ठाकरे सेनेतील नेत्यांना लगावला.

Deepak Kesarkar
Sanjay Raut : 'शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, 16 आमदार अपात्र ठरतील'

भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता केसरकर म्हणाले, ‘‘ईश्वराने जीभ दिली म्हणून काहीही बोलणे योग्य नाही. जनता आमदार म्हणून निवडून देते. त्या वेळी त्याचे त्या परिसरात योगदान असते. खरे तर बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आजही महाराष्ट्रात आहे; पण काँग्रेस व राष्ट्रवादीला घेऊन आपण निरंतर सत्तेत राहू शकतो, असा ज्यांचा भ्रम होता, तो दूर झाला आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे शिवसेना व भाजपची (BJP) विचारप्रणाली वेगळ्या स्वरूपाची आहे. ती हिंदुत्ववादी विचारप्रणाली आहे. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विचाराने मोठी झाली. त्या विचारांपासून आपण दूर जाऊ लागलो आणि छत्रपतींच्या वारसांकडूनच स्टॅंपपेपर लिहून मागायला लागलो, तर मग छत्रपतींचे नाव घेण्याचा हक्क कोणाला शिल्लक राहतो.’’

Deepak Kesarkar
Kesharinath Tripathi : भाजपचे ज्येष्ठ नेते केशरीनाथ त्रिपाठींचं निधन; 3 वेळा भूषवलं होतं विधानसभेचं अध्यक्षपद

केसरकर म्हणाले, ‘‘सध्या राजकारणात एक नवे पीक आले आहे. छत्रपतींच्या नावाचा वापर करायचा; परंतु त्यांच्या वारसांना मान द्यायचा नाही. यातून आपणच जणू सर्व काही असल्यासारखे भासविण्याचा प्रयत्न होतोय तो चुकीचा आहे. राजाचा वारसा प्रजेचा असतो. आपण राजघराणे होऊ शकत नाही. हा मान छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. राजघराण्यातील १३ वी पिढी आपल्याकडे आहे, त्यांचा मान ठेवणे गरजेचे आहे.’’ आपल्या परंपरेचा गौरव तुम्ही करणार नाही. तुम्ही कोणत्या दर्जाची भाषा वापरता यातून राज्याचे चित्र देशापुढे व परदेशात जाते. असे बोलणाऱ्या इनडिसेंट माणसांमुळे आपल्याकडे गुंतवणूक कशी येणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Deepak Kesarkar
VIDEO : राष्ट्रगीत सुरू असतानाच 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी केली पँटेत लघवी; 6 पत्रकारांना अटक

विरोधकांना सत्ता गेल्याचे दु:ख

शिंदे गट आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय होईल यावर विरोधकांच्या चर्चेविषयी विचारले असता केसरकर म्हणाले, ‘‘त्यांचे पाय जमिनीवर राहिलेले नव्हते. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. न्यायालयात निर्णय देण्यास न्यायाधीश बसले आहेत. त्यांना सगळे कळते. आमचा निर्णय अंतिम आहे. आम्हाला भाजपमध्ये जायचे असते, तर आमच्यावर कोणी केसही करू शकले नसते. खरी शिवसेना आमचीच असून, बाळासाहेबांचे शिलेदार म्हणून हा लढा उभा केला. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तावडीतून शिवसेनेला सोडवून आणले. याबद्दल लोक कौतुक करतात; पण विरोधकांना त्यांचे राज्य गेल्याचे दुःख असून, आमची सत्ता का आली, त्यांची सत्ता का गेली या चर्चेतच त्यांना रस आहे.’’ जनतेच्या प्रश्नाचे त्यांना देणे- घेणे नाही, असा टोलाही मंत्री केसरकर यांनी महाविकासच्या नेत्यांना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com