Maharashtra-Gujarat: आता 'या' गावांना जायचंय गुजरातमध्ये; तहसीलदारांना निवेदन

Maharashtra Border Issue
Maharashtra Border Issueesakal

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न निर्माण झालेला असतांना आता नवीनच मुद्दा पुढे आलाय. नाशिकमधल्या काही गावच्या ग्रामस्थांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केलीय.

नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील काही आदिवासी पाडे आणि गावातील लोकांनी सुरगणाचे तहसीलदारांना याबाबचे निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी गावकऱ्यांसह ही मागणी केलीय.

हे ही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

सुरगणा तालुक्यातील नेमकी गावं कोणती, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या दुर्गम भागातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वीज, पाणी आणि शिक्षण मिळत नाहीये. सरकारं बदलतात परंतु या भागातील लोकांचे मुलभूत प्रश्न सुटत नाहीत.

Maharashtra Border Issue
Shraddha Murder Case: नार्को टेस्टमध्ये आफताबला विचारले 'हे' प्रश्न; 'त्या' सहा महिन्यांमध्ये नेमकं काय घडलं?

विशेषतः या आदिवासी दुर्गम भागामध्ये महिलांना रात्री-अपरात्री पाण्यासाठी मैलन्मैल भटकंती करावी लागते. उन्हाळ्यात तर रात्रीच्या वेळी टेंभे घेऊन पाणी आणावे लागते. अडलेल्या महिलांना डोली करुन आरोग्य केंद्रामध्ये न्यावं लागतं. समस्या सुटत नसल्याने आणि आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी गावचा समावेश गुजरातमध्ये करावा, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com