
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर असे पाच दिवस उपोषण केलं. या उपोषणामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण झाला आणि मराठवाड्यातील मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र यावरुन सध्या ओबीसी नेते नाराज झाल्याचं दिसून येतंय.