फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा; देश एक होत असल्यानेच...

Criticism of BJP as the country is uniting
Criticism of BJP as the country is unitingCriticism of BJP as the country is uniting

नागपूर : पाच राज्यांत मिळालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस निराश झाली आहे. प्रत्येक राज्यात होत असलेला पराभव आणि एकएक शिलेदार काँग्रेसला सोडून चालल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हतबल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यासपीठावर टीका करून ते आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. (Criticism of BJP as the country is uniting)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंब्रिज विद्यापीठात भाजपमुळे भारतात अशांतता निर्माण झाल्याचा आरोप केला होता. काँग्रेसच्या (Congress) लांगूलचालनाच्या धोरणामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. आता हे वातावरण बदलून आपण सगळे भारतमातेचे पूत्र आहोत, अशी भावना देशामध्ये तयार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश एक होत असल्यानेच ही मळमळ बाहेर येत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

Criticism of BJP as the country is uniting
‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर...’

महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नाही

सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी अशी धडपड केली असती तर बरं झाल असतं. ओबीसी आरक्षणासाठी (Obc Reservation) धडपड करण्याची गरज असताना मलिकांसाठी यांनी धडपड केली. याच्या अर्धी धडपड जरी केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते. दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नाही, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com