

devendra fadnavis
esakal
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागपुरमध्ये बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया दिली. धीरेंद्र शास्त्रींनी हिंदूंना ४ मुलं जन्माला घालावी आणि १ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावं असं विधान केलं होतं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते आणि रामदास स्वामींना त्यांनी राजपाट सांभाळावा अशी विनंती केली होती असंही म्हटलं होतं. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.