

CM Devendra Fadnavis
ESakal
मुंबई : हवामान बदल कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुंबई क्लायमेट वीकचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.