
बीड: राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे बंजारा समाजानेही आपल्याला एसटीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी सोमवारी (ता. १५) मोर्चा काढण्यात आला होता. एसटीचे आरक्षण लागू करा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन काळा दिन म्हणून साजरा केला जाईल, असा इशारा विराट मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला आहे.