मुंबईत वाहतूक कोंडीमुळे जवळपास ३ टक्के जोडप्यांचा घटस्फोट होत असल्याचा धक्कादायक दावा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केला होता. यावरून अनेकांनी त्यांच्यावर टिका केली. यात शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी सुट्टीचा ब्रेक घ्या म्हणत अमृता फडणवीसांवर मिश्कील स्वरूपात टिका केली होती. त्यांच्या या ट्वीटवर अमृता फडणवीसांनी उत्तर दिले.
अमृता फडणवीसांनी ट्वीट करत म्हणाल्या,“अहो बाई, सत्यापासून दूर जाऊ नका. सर्वे मंकीच्या अहवालानुसार प्रचंड ट्रॅफिक जाम आणि वाहतुकीला होणारा विलंब यामुळे मुंबईकर मानसिक आणि शारीरिक आजाराने त्रस्त आहेत. कर्मचाऱ्यांची उत्पादकता कमी झाली आहे आणि घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे. तुमचे आणि तुमच्या लोकांचे आभार.”
शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत अमृता फडणवीस यांच्यावर टिकी केली होती, “सर्वोत्कृष्ट (il)लॉजिक ऑफ द डे अवॉर्ड त्या महिलेला जातो ज्या दावा करतात की 3% मुंबईकरांचा रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होतात. ब्रेकवर मन ठेवण्यापेक्षा सुट्टीचा ब्रेक घ्या..बंगळुरू कुटुंबांनी कृपया हे वाचणे टाळा, तुमच्या विवाहासाठी घातक ठरू शकते”
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.