

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झालीय तर इच्छुकांनीही दंड थोपटले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपने बीएमसीत दीडशे पारचा नारा दिलाय. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं चर्चेला उधाण आलंय.